पंचकर्म म्हणजे काय आणि ते का करावे, वाचा थोडक्यात...



आयुर्वेद शास्रामध्ये पंचकर्म चिकित्सा पद्धतीला गौरवास्पद स्थान आहे. पंचकर्म चिकित्सा पद्धती तत्काळ फळ देणारी आणि चिर काळापर्यंत स्वास्थ्य टिकवून ठेवणारी असून आजच्या क्षणाला अनेक वैद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
खालील लिंकवर क्लिक करुन वाचा अधिक
पंचकर्म चिकित्सा पद्धतीमध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या पाच कर्मांचा समावेश होतो. पंचकर्माचा उपयोग अनेक व्याधींमध्ये होतो. 21व्या शतकात दैनंदिन जीवनशैली खूप बदललेली आहे. नेहमी IT कंपनीत काम करणार्यांच्या जीवनशैलीवर टीका केली जाते. मात्र डोळे उघडून पाहिलं तर दिसेल की अगदी 10 वी च्या विद्यार्थ्यापासून ते पद्व्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत, तसेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रपाळी करणारे यांची जीवनशैली अतिशय कोलमडलेली दिसून येते. मेट्रो सीटीमध्ये तर फॅशन म्हणून त्यांनी या जीवनशैलीचा स्वीकार केला जातो. कितपत योग्य अयोग्य ते नंतर बघू, मात्र या कारणाने शरीरात होणारे बदल व त्यामुळे निर्माण होणारे व्याधी यांची चिकित्सा पंचकर्माने खूप यशस्वीरित्या केली जाते. अर्थात औषधी चिकित्सेचा आधार घ्यावा लागतोच. पंचकर्मानंतर औषधी चिकित्सा केली तर व्याधी लवकरात लवकर आटोक्यात येतो.
बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या काही व्याधी व लक्षणे पुढीलप्रमाणे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
१. हस्ततलदाह (तळ हातांची आग होणे.)
२. पादतलदाह ( तळ पायांची आग होणे. )
३. नेत्रदाह
४. अकाली केस गळणे.
५. अकाली केस पिकणे.
६. मलावष्टंभ.
७. अपचन.
८. थकवा जाणवतो.
९. वजन वाढ.
१०. उत्साहहानी.
११. पित्ताचे विकार.
१२. मानेचे, पाठीचे, कंबरेचे विकार.
१३. वंध्यत्व.
व्याधी होऊ नये म्हणून जीवनशैली सुधारा व झाले तर पंचकर्माच्या सहाय्याने कमी करा. निरोगी व आनंदी जीवन जगा....

No comments:

Post a Comment